नांदेड – नांदेड जिल्ह्यातील गोरक्षक आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने गायींच्या तस्करीचे आणि कत्तली चे सुमारे १७५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. जवळच असलेल्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यांमध्ये गोहत्या बंदी नाही. त्यामुळे भारताच्या काही भागातुन विदर्भातील यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातुन नांदेड मार्गे तेलंगणा राज्यात गोतस्करी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे कर्तव्य आहे की त्यांनी एकत्र येऊन गो तस्करी थांबवावी आणि सरकारने घोषित केलेल्या राज्यमाता व गोसंवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, संपुर्ण राज्य गोहत्या पापा पासुन पुर्णपणे मुक्त व्हावे, असे मत मलुकपिठाधिश्वर राजेंद्रदासजी महाराज यांनी पिंपळगाव येथे शिवमहापुराण कथे दरम्यान व्यक्त केले ते येथिल गोरक्षण परस्थिची माहिती झाल्यावर त्यांनी गोहत्या, तस्करी संदर्भात चिंता व्यक्त केली.
एक वर्षापुर्वी नांदेड जिल्हयातील, गोरक्षक कसायां कडुन अवैद्य वाहतुक करणाऱ्या गायी थांबवण्यासाठी प्रामाणिक पणे मैदानावर ऊतरला होता, तेंव्हा कसायांनी भ्याड हल्ला करून गोभक्ताची हत्या केली, या गोभक्ताने गायीसाठी आपले जीवन अर्पण केले आहे, ही खुप दुःखाची, दुर्दैवाची गोष्ट आहे. गोहत्या थांबवणे हे केवळ राज्यकर्त्याचे किंवा केवळ नागरिकांचे कर्तव्य नाही, सरकार – नागरीक दोघांनीही गोहत्या बंदी करण्याच्या या पवित्र कार्यात एकत्रितपणे सहभागी झाले पाहिजे असही ते म्हणाले.

पुढे बोलतांना राजेंद्रदास महाराज म्हणाले; आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, मुघलांकडुन भयंकर जुलूम केला जात होता, भारताच्या भुमीवर हल्ला झाला होता, संस्कृतीवर हल्ला झाला होता, वेद इतर धर्मग्रंथ जाळले जात होते. त्या युद्धाच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालपणी एका गोहत्या करणाऱ्या कसायाचा सार्वजनिकरित्या शिरच्छेद केला होता, तेंव्हा कसायाच्या हातातुन गाय वाचवली होती. त्यांनी विजापुरच्या महाराजांच्या दरबारात उत्तर दिले. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने हे होणार नाही, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतल्याने हे साध्य होणार नाही. गोरक्षणासाठीचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा संकल्प, या पिता-पुत्रांचे प्रयत्न, गोरक्षणा प्रतीची त्यांची वचनबद्धता या गोष्टी तेव्हा यशस्वी होतील. जेंव्हा त्या आपल्याकडुन प्रत्यक्ष अमलात आनल्या जातील.
आम्ही भगवान शंकर, दत्तात्र्याकडे प्रार्थणा करतो लवकरात लवकर, कमीत कमी दिवसांत संपुर्ण भारत देश, अखंड भारत भुमी गोहत्येच्या कलंकातुन सदैव मुक्त होवो, असीही त्यांनी प्रार्थणा केली.
